मी काय बोलणार? तिचा प्रश्न खरा होता. काटेरी होता. जणू सूळकाटाच.
प्रसिद्ध लेखक ल. सि. जाधव यांच्या ‘होरपळ’ या गाजलेल्या आत्मकथनाचा हा दुसरा भाग. हे आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दु:ख व्यक्त करतं. आणि त्याकडे उदार दृष्टीनं पाहण्याचाही प्रयत्न करतं. हा ‘सूळकाटा’च, सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा आणि जीवनविषय अंतर्दृष्टी देणाराही. हे आत्मकथन नुकतंच रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यातील हा संपादित अंश.......